मैत्री... त्या दोघींची!
चित्रपट लेखक सलीम खान यांच्या एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं की, चांगला माणूस कसा ओळखायचा...?
त्यावर त्यांचं उत्तरं फार मार्मिक होत...
"जिसका दोस्त और नौकर पुराना हैं, वही हैं सही आदमी।"
कधी कधी ही दोस्ती इतकी ' पुराणी ' असते की कपाटातील त्या कोपऱ्यात जाऊन पडते.
ते दुमडलेल प्लास्टिक, आत पुठ्ठ्या चा बॉक्स,
त्यात चूरगळलेल्या अस्वस्थेतील ती सारी पत्र...
पोस्ट कार्ड, आंतरदेशीय तरं कधी जागा कमी पडतेय म्हणून अगदीं पोस्ट पाकीट...
किती भरभरून लिहायचो आपण त्या दिवसात.
शाळा/ कॉलेज ला एकत्र होतो पण नंतर दुरावलो.
तू या गावात तरं मी त्या...
कधी शिक्षणासाठी तर कधी नौकरीसाठी.
नवीन मित्र- मैत्रिणी मिळालेच म्हणा तिथे ही... पण... पण... आपली बातच निराळी.
काहीही शेअर करायचं असलं की हक्काची जागा, म्हणजे एकमेकिंचा खांदा!
सॉरी, मी कितीतरी वेळा रडून रडून ओला केलाय तुझा.
पण तूही काही कमी नाही हां...सर्व हट्ट पुरवून घ्यायचीस. अंगात ताप भरला की तुला मंचाव सूप आठवायच...
मग, त्या चायनिज च्या गाडीचा शोध आणि वन बाय टू ची ऑर्डर. तुझ्या त्या तापाचा आणि चायनिज सूप चा काय संबंध हे मला न उलगडलेलं कोडं!
काही ग्रिटींग्ज आणि काही कविता ही आहेत ग यात...
त्यानी दिलेल्या.
पण, मी त्या स्वतः बघण्या आधी तुझी वाट बघत बसायची. माझं हे असं होत. प्रत्येक गोष्टीत तुझं मत महत्वाचं वाटायच.
दूरावलो पण पत्रांद्वारे संपर्क होताच की.
मग कधी तरी STD...
लाईनीत उभ राहायचा कंटाळा यायचा. पण एकदा तुझ्याशी बोलले की कसं हलकं वाटायचं!
आता काळ पुढे जातच राहतो. रहाटगाडा चालूच आहे. जबाबदाऱ्या आहेत. संसाराच्या, मुलांच्या, नोकरीच्या...
आणि तशीही मैत्री जाणारं तरी कुठे...?
फोन होतोच की महिन्यातून एखाद वेळा. नाहीतर व्हॉटस अँप ग्रुप आहेच की. दिवसभर कुणाचा तरी फॉरवर्ड असतोच एखादा. नाहीतर कोण कुठे गेला त्याचा फोटो. जग किती जवळ आलंय नं... या सर्वांमुळे.
कुणी आज काय खाल्ले हे देखील क्षणात समजत!
पण तरीही, आज ही सर्व पत्र, ग्रिटींग्ज बघून अस्वस्थ का वाटतंय... व्हॉट्स ऍप वर तर आता व्हिडिओ कॉल ही आलाय. पण तरीही हुरहुर आहेच. एकटेपणा आहेच. तू सोबत असली की नाही वाटायचं असं कधी.
नाहीतर तुझी ही पत्र... कितीतरी वेळा वाचायची मी पुन्हा पुन्हा... वाटायचं तू जवळच आहेस कुठेतरी. ती मजा या मोबाईल मध्ये नाहीं ग...
अरेच्चा, धूळ साचलीये या पत्रांवर किती.
झटकली पाहिजे... थांब.
...या मेसेज आणि फोन पेक्षा एकदा प्रत्यक्ष कडकडून भेटलो पाहिजे... मग बघुया, कशी धूळ साचते ती...
चित्रपट लेखक सलीम खान यांच्या एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं की, चांगला माणूस कसा ओळखायचा...?
त्यावर त्यांचं उत्तरं फार मार्मिक होत...
"जिसका दोस्त और नौकर पुराना हैं, वही हैं सही आदमी।"
कधी कधी ही दोस्ती इतकी ' पुराणी ' असते की कपाटातील त्या कोपऱ्यात जाऊन पडते.
ते दुमडलेल प्लास्टिक, आत पुठ्ठ्या चा बॉक्स,
त्यात चूरगळलेल्या अस्वस्थेतील ती सारी पत्र...
पोस्ट कार्ड, आंतरदेशीय तरं कधी जागा कमी पडतेय म्हणून अगदीं पोस्ट पाकीट...
किती भरभरून लिहायचो आपण त्या दिवसात.
शाळा/ कॉलेज ला एकत्र होतो पण नंतर दुरावलो.
तू या गावात तरं मी त्या...
कधी शिक्षणासाठी तर कधी नौकरीसाठी.
नवीन मित्र- मैत्रिणी मिळालेच म्हणा तिथे ही... पण... पण... आपली बातच निराळी.
काहीही शेअर करायचं असलं की हक्काची जागा, म्हणजे एकमेकिंचा खांदा!
सॉरी, मी कितीतरी वेळा रडून रडून ओला केलाय तुझा.
पण तूही काही कमी नाही हां...सर्व हट्ट पुरवून घ्यायचीस. अंगात ताप भरला की तुला मंचाव सूप आठवायच...
मग, त्या चायनिज च्या गाडीचा शोध आणि वन बाय टू ची ऑर्डर. तुझ्या त्या तापाचा आणि चायनिज सूप चा काय संबंध हे मला न उलगडलेलं कोडं!
काही ग्रिटींग्ज आणि काही कविता ही आहेत ग यात...
त्यानी दिलेल्या.
पण, मी त्या स्वतः बघण्या आधी तुझी वाट बघत बसायची. माझं हे असं होत. प्रत्येक गोष्टीत तुझं मत महत्वाचं वाटायच.
दूरावलो पण पत्रांद्वारे संपर्क होताच की.
मग कधी तरी STD...
लाईनीत उभ राहायचा कंटाळा यायचा. पण एकदा तुझ्याशी बोलले की कसं हलकं वाटायचं!
आता काळ पुढे जातच राहतो. रहाटगाडा चालूच आहे. जबाबदाऱ्या आहेत. संसाराच्या, मुलांच्या, नोकरीच्या...
आणि तशीही मैत्री जाणारं तरी कुठे...?
फोन होतोच की महिन्यातून एखाद वेळा. नाहीतर व्हॉटस अँप ग्रुप आहेच की. दिवसभर कुणाचा तरी फॉरवर्ड असतोच एखादा. नाहीतर कोण कुठे गेला त्याचा फोटो. जग किती जवळ आलंय नं... या सर्वांमुळे.
कुणी आज काय खाल्ले हे देखील क्षणात समजत!
पण तरीही, आज ही सर्व पत्र, ग्रिटींग्ज बघून अस्वस्थ का वाटतंय... व्हॉट्स ऍप वर तर आता व्हिडिओ कॉल ही आलाय. पण तरीही हुरहुर आहेच. एकटेपणा आहेच. तू सोबत असली की नाही वाटायचं असं कधी.
नाहीतर तुझी ही पत्र... कितीतरी वेळा वाचायची मी पुन्हा पुन्हा... वाटायचं तू जवळच आहेस कुठेतरी. ती मजा या मोबाईल मध्ये नाहीं ग...
अरेच्चा, धूळ साचलीये या पत्रांवर किती.
झटकली पाहिजे... थांब.
...या मेसेज आणि फोन पेक्षा एकदा प्रत्यक्ष कडकडून भेटलो पाहिजे... मग बघुया, कशी धूळ साचते ती...
No comments:
Post a Comment