कस्तुरा आक्का. एक वल्ली.
काल रात्रीचीच गोष्ट, जेवणा आधी आईला विचारलं, काय भाजी? म्हणाली गिलके...
थोडा मुड ऑफ झाला. पण चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. मोठं झाल्याचा हा एक तोटा असतो.
लहानपणी मात्र असं काही उत्तर आलं की माझा दुसरा प्रश्न असायचा...
मग, आक्कांकडे काय केलय?
किंवा, मम्मीकडे काय बनवलय?
...हे नातं होतं.
आक्कांच्या हातची पाटोड्याची भाजी, डबुकडे सर्वात जास्त टेस्टी. दादांना लवकर कारखान्यात, तिथून मग शेतात जायचे असायचे त्यामुळे आक्कांचा स्वयंपाक लवकर व्हायचा. दादांना टीपॉय वर आक्का एकदम सिस्टीमेटिक ताट वाढून द्यायच्या. त्या ताटात सर्वच असायचं. ते बघून जेवणाची वेळ झाली नसली तरी आपल्याला ही भूक लागायची.
लहानपणी आक्का आणि मम्मी आईला, तू काय व कुसुम... असं उच्चारायच्या आणि आई त्यांना मान द्यायची त्यावेळी मला चकित वाटायचं. पण नंतर कळलं त्यांच्यात आई मुलीच नात होतं.
आक्का, कुणालाही काहीही बोलू शकायच्या. अगदीं, समोरच्या माणसाची भीडभाड न ठेवता. कारण त्यांचा स्वभाव बिनधास्त होता. आक्कांची स्वतः ची अशी एक डिक्शनरी असावी की काय असं वाटण्या इतपत त्यांच्या कडे अहिरणीतील नवे नवे शब्द असायचे. पुन्हा गॅलरी समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांना त्यांनी टोपण नाव बहाल केलेली होती. ते खास आक्कांच्या शैलीत ऐकून जाम मजा वाटायची. दुंड्या सर, पोलीस पिंट्या, ही काही उदाहरणे...
इतक्या वर्षांच्या साक्री तालुक्यातील संसारा नंतरही आक्कांच्या बोलण्यातल माहेर संपलं नव्हतं. त्या लील्या... ऐवजी घी घ्या... असंच म्हणायच्या.
लहानपणी आमच्या दादांनी रागवल, एस जी साक्री वाल्यांनी बॉल दिला नाहीं किंवा कोठावदे बुक स्टॉल वाल्यानी काही तरी खडूस वाक्य फेकल की ज्याम राग यायचा.
पण, आक्कानी दुपारी त्यांच्या घरातून हाथ पकडून हाकलून दिलं तरी आम्हीं निर्लज्ज सारखे पुन्हा संध्याकाळी जाऊन बसायचो.
जिथं जितू दादा, बंटी आबा, भारती माई हे देखील हाकलले जायचे तिथं आपण, किस खेत की मूली असं वाटतं असावं!
त्याकाळात, कदाचित आक्का हिचं एक व्यक्ती असावी जीचा कुणाला राग येत नसावा.
माझ्या साठी आक्कांच सर्वात आवडत वाक्य म्हणजे, "दिपू खिरुज लई जाय बरका..." त्या दिवशी सर्वांच्या घरी खिरूज च्या पाटोड्या किंवा लाडू बनायचे.
मला वाटतं, गॅलरीमध्ये आक्कांच घर सर्वात जास्त हॅपनिंग आणि ग्लॅमरस होतं. त्यांच्या घरात अगदीं छोटी घटना घडली तरी ती स्पेशल असायची. त्यात सर्वांचा सहभाग असायचा. धाडण्याच्या शेतातील भाजलेल्या ओल्या शेंगा, द्रक्षांसाठी लागणारे बॉक्स आणि त्यावर मारायचा शिक्का, कपू बाईच्या लग्नातील पत्रिका घडी करून पाकिटात टाकने, प्लास्टिक चे गोल गोल डिजाइन वाले पडदे बनवणे किंवा लोकर ची पिशवी... हे सर्व आइटम्स आक्कांच्याच घरात बनवले जातील असा अलिखित नियम होता!
पुन्हा गॅलरीत कुणाकडेहि नव्हते अशा वस्तू फक्तं त्यांच्या घरी होत्या जसे की त्यांचा कलर टीव्ही, गोदरेज कपाटात ठेवलेले स्टेपलर आणि पंचिंग मशीन, नवे कोरे फ्रिज आणि पाण्याच्या बाटल्या, मधल्या घरात ठेवलेली काचेची कपाट, ज्यात सर्वात भारी कप बशी, सरबत देण्याचे काचेचे ग्लास, कपु बाईने साफ करून चमकून ठेवलेले असायचे.
त्यामुळे, यांतील कुठलीही गोष्ट लागली की आक्कांची आठवण काढली जायची.
आक्कांच्या घरातील कुठल्याही विषयावर होणारी चर्चा हा एक अफलातून प्रकार होता. त्याची सुरवात आक्का करायच्या आणि मधूनच उठून किचन मध्ये जाऊन चहा ठेऊन यायच्या. शोभा ताई, रत्ना माई गावाहून आल्या की आम्हीं ही जाऊन बसायचो. त्या काळात मला माझे छडवेल चे नातेवाईक कोण हे कदाचित सांगता आले नसते पण मी, जगू मामा, नऱ्हा मामा, पला, कैल्या, लक्समा आक्का, मंगल, नाराबाबा, लखा मास्तर इत्यादी कॅरेक्टर्स बद्दल कॉन्फिडन्टली बोलू शकलो असतो.
गॅलरीतली दुपार म्हणजे, एक पाय लांब आणि दुसरा दुमडून जात्यावर हरभऱ्याची डाळ भरडणाऱ्या आक्का, हे चित्र माझ्या मनात पुरतं कोरल गेलं आहे.
आक्का निवांत क्वचित बसल्या असतील असं वाटतं. नेहमी काहीतरी निवड, भरड, सोल असच करतांना आठवतात. मम्मी सोबत बहिणींचं तरं देवरे मावशीं सोबत मैत्रीच नातं असावं असं मला वाटतं. मागच्या दारी यांना हसून गप्पा मारताना पाहिलेल आठवत.
शेवाळीचे भाऊसाहेब गेले ही बातमी आली तो प्रसंग सर्वात वाईट होता. गॅलरीतील प्रत्येक घरात रडारड चालू होती. तोवर रघुदादांना नेहमीच शिस्तीत आणि फ्रेश बघत आलो होतो. त्यामुळे दादा समोर आले तरी उठून उभे राहायची सवय होती. पण त्या दिवशी मधल्या घरात, शंकराच्या फोटो समोर दादांना धाय मोकलून रडतांना पाहिलेला प्रसंग आजही आठवला तरी आंगावर काटा उभा राहतो. इतके मोठे दादा अश्या पद्धतीने रडतांना बघितल्यावर त्या वयात काहीच सुचत न्हवत. पण अश्या प्रसंगात देखील आक्का खंबीर उभ्या होत्या. दादांचं सांत्वन करत होत्या.
संतू भाऊ चा अपघात झाला त्याकाळात तरं दादा बरेच हळवे झाले होते पण आक्का खंबीर राहिल्या. कदाचित आतून त्यांना वाटतं असावं पण वरून तरी त्या सर्व चांगलं आहे असा आव आणायच्या. उलट आपण त्याला जगण्याचा पॉझिटिव अप्रोच म्हणून बघितलं तरं त्याच महत्त्व लक्षात येईल.
सकाळी भाऊंना फोन केला तेंव्हा ते म्हणाले, आक्कानी करोनाची टेस्ट केली म्हणून कदाचित कच खाल्ली असेल आणि त्यातूनच हार्ट अटॅक आला असेल... त्यावेळीं मला प्रश्न पडला, इतक्या मोठ्या मोठ्या संकटाना धिरानी सामोरी जाणारी आक्का अशी बरे कच खाईल. कदाचित हे नियतीनं ठरवलेलं प्रारब्ध असेल. कारण सत्तरी पार केली तरी अक्का मात्र कणखर वाटायच्या.
खूप वर्ष संपर्क न्हवता. नौकरी संसार तो ही दूर मुंबईत. त्यामुळे आई आणि भारती माई कडून फक्तं खबर मिळायची. पण, माझा सिनेमा आला त्याकाळात अचानक एक फोन आला. मी एका शूट वर होतो. समोरून एका ज्येष्ठ बाईंचा आवाज आला. मी अक्का बोली राहिणू.
इतक्या वर्षांनी तो आवाज ऐकत होतो तरी कोणती आक्का हे मला लगेच समजलं.
" भाऊ तूले मी टी वी वर दखं. तू आते, पाहिले पेक्षा चांगला दिसाले लागणा. तूनी बाई भी चांगली शे..."
आक्कांचा अचानक आलेला तो कॉल, माझ्या कायम स्मरणात राहील.
बापू, वारले तेंव्हा शोभा ताई कडे भेटायला गेलो तर आक्कांनी लागलीच मुका घेतला. मला भारी वाटलं.
भेटलो, की आजही मम्मी पप्पी घेतात हे नेहमीच आहे. पण आक्कांनी ही घेतली तेंव्हा आता त्या खूप हळव्या झाल्या आहेत की काय असं जाणवलं. पण मग मी तो विचार लगेच झटकून दिला. कारण अक्कांचा तो स्वभाव नव्हता. आक्का म्हणजे कणखर ही डेफिनेशन होती.
एकदा आमची मोटारसायकल चोरीला गेली. त्यावेळीं कारखान्याचे दिवसही फार बरे नव्हते. आई तरं हळवी होऊन रडत होती. नशिबाबद्दल बोलत होती. त्यावेळी, दादा आणि आक्का घरी आले आणि म्हणाले,
"दादा मना इतला सोना सारखा जावई चोरी व्हई गया, तूना मायक फटफटी नहीं ते दुसरी कितली भी मौल्यवान वस्तू चोरी जाती ते मी रडतू नहीं..."
त्या दिवसानंतर मात्र आमच्या घरात कुणीच चोरलेल्या मोटारसायकल चा विषय काढला नाहि!
आज सकाळपासून आईशी आक्कांबद्दल बोलतोय, ती म्हणतेय, आपण सर्व मनुष्य प्राणी. त्यानुसार आपल्यात इगो असतो, कधी कधी इर्षा असते, इतरांविषयी राग येतो त्यातून आबोला होता... इतकी वर्ष शेजारी शेजारी राहिल्यामुळे कधीतरी भांड्या ला भांड लागलं ही असेल.
आक्कांसोबत क्वचित असे प्रसंग घडलेही असतील पण आक्कनी कधी राग केला नाही की कधी मनात ठेवलं नाहीं. तेवढ्या पुरता मी अक्काला ऐकूनही द्यायची, ती ही गुपचूप ऐकून घ्यायची आणि दुसर्या दिवशी परत कुसुम कुसुम म्हणत जवळ यायची.
पुलं देशपांडेच एक गाजलेले पात्र आहे, अंतू बरवा नावाचं. मला, आक्का त्या अंतू बरवा सारख्याच वाटतात. पुलंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, बाहेरून नारळा सारख्या कितीही टणक वाटल्या तरी आतून खोबर्या सारख्या मऊ!
आपल्याला पहाटे साडेचार वाजता उठून शेतात जाणारे शिस्तप्रिय दादा आठवत असतील पण त्यांना त्यावेळी चहा करून देणारी आक्का ही असेलच की.
इथ आपण एक दोन मुलांना वाढवताना थकतोय, तिथं सहा मुलामुलींना वाढवणं निश्चितच सोपं नसेल...
राजवाड्याची पडझड झाली. एक एक करून सर्वच घर सोडून जायला लागले. देवरे मावशी तर खूप आधीच धुळ्याला शिफ्ट झाल्या. नंतर आलेल्या सुनंदा आक्का ही आबा दक्षिण आफ्रिकेत गेले म्हणून गावी गेल्या. के. जे. दादांनी ही नवीन घर बांधल.
जितू दादाच लग्न म्हणून गॅलरीतून सर्वात आधी मम्मी गेल्या. मग काही दिवसांनी आक्काहि जाणारं ही बातमी आली.
त्यावेळी मला आठवतं, मी बाहेर शिकत होतो.
जोशी दादा मावशी, आक्कांचं घर आणि आमचे आई दादा इतकीच मंडळी राहिलेली. त्यात आई दादांना सर्वात मोठा आधार आक्कांच्या घराचा होता.
आता ते ही कॉलनीत राहायला जाणार होते म्हणून बाहेर गावी होतो तरी गॅलरी सुनी झाली म्हणून लक्ष लागत नव्हत.
पडक्या गॅलरीत राहणारे आई-दादा आणि जोशी दादा मावशी आठवले की शिकणाऱ्या दिवसांत वाईट वाटायचं.
मग काही वर्षांनी जोशी मावशी गेल्या नंतर दादा. खूप वाईट वाटलं. त्यांना शेवटच्या दिवसांत आपण बघुही शकलो नाही ही खंत होतीच. मध्ये नाशिक ला एका लग्नात जोशी भाऊ भेटले. त्यावेळी दादा मावशींचा विषय निघाला तसे भाऊंचे चे डोळे पाणावलेले जाणवले. जुने दिवस आठवले. आमचे दादा जाऊनही दहा वर्षे झाली. गेल्या वर्षी के जे दादा गेले तेंव्हा राहुलनी बऱ्याच आठवणी सांगितल्या वाड्याच्या. आणि आता काल आक्का.
एखादी जागा तुम्हाला किती देऊन जाते. बालपण, संस्कार जगण्याचा अप्रोच असं बरंच काही.
आता असं वाटतं आपल ही अर्ध आयुष्य संपलं. वाड्यात फार-फार सतरा अठरा वर्षे राहिलो असेल. आता त्याहून अधिक जगल गेलं. म्हणजे वाड्यापेक्षा अधिक चा काळ बाहेर घालवला गेला. कधी बालपणीतल्या एखाद्या प्रसंगाचे स्वप्न जरी पडले तरी त्यात बॅकग्राउंडला वाडा आणि गॅलरीतील ते घरच येतं. अजूनही तिथल्या आठवणीं जात नाहीत. त्या हृदयाच्या एका कोपऱ्यात सदैव जपून ठेवलेल्या असतील. त्यात आक्कंची देखील एक फिक्स जागा असेल हे निश्चित!
बाळासाहेबा इतक्या दुरून आक्काची बातमी वाचून एका वाक्यात जर म्हणत असतील की she was like second mother to everyone... म्हणजे यातच सर्व आलं कि !
आक्का तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
काल रात्रीचीच गोष्ट, जेवणा आधी आईला विचारलं, काय भाजी? म्हणाली गिलके...
थोडा मुड ऑफ झाला. पण चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. मोठं झाल्याचा हा एक तोटा असतो.
लहानपणी मात्र असं काही उत्तर आलं की माझा दुसरा प्रश्न असायचा...
मग, आक्कांकडे काय केलय?
किंवा, मम्मीकडे काय बनवलय?
...हे नातं होतं.
आक्कांच्या हातची पाटोड्याची भाजी, डबुकडे सर्वात जास्त टेस्टी. दादांना लवकर कारखान्यात, तिथून मग शेतात जायचे असायचे त्यामुळे आक्कांचा स्वयंपाक लवकर व्हायचा. दादांना टीपॉय वर आक्का एकदम सिस्टीमेटिक ताट वाढून द्यायच्या. त्या ताटात सर्वच असायचं. ते बघून जेवणाची वेळ झाली नसली तरी आपल्याला ही भूक लागायची.
लहानपणी आक्का आणि मम्मी आईला, तू काय व कुसुम... असं उच्चारायच्या आणि आई त्यांना मान द्यायची त्यावेळी मला चकित वाटायचं. पण नंतर कळलं त्यांच्यात आई मुलीच नात होतं.
आक्का, कुणालाही काहीही बोलू शकायच्या. अगदीं, समोरच्या माणसाची भीडभाड न ठेवता. कारण त्यांचा स्वभाव बिनधास्त होता. आक्कांची स्वतः ची अशी एक डिक्शनरी असावी की काय असं वाटण्या इतपत त्यांच्या कडे अहिरणीतील नवे नवे शब्द असायचे. पुन्हा गॅलरी समोरील रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांना त्यांनी टोपण नाव बहाल केलेली होती. ते खास आक्कांच्या शैलीत ऐकून जाम मजा वाटायची. दुंड्या सर, पोलीस पिंट्या, ही काही उदाहरणे...
इतक्या वर्षांच्या साक्री तालुक्यातील संसारा नंतरही आक्कांच्या बोलण्यातल माहेर संपलं नव्हतं. त्या लील्या... ऐवजी घी घ्या... असंच म्हणायच्या.
लहानपणी आमच्या दादांनी रागवल, एस जी साक्री वाल्यांनी बॉल दिला नाहीं किंवा कोठावदे बुक स्टॉल वाल्यानी काही तरी खडूस वाक्य फेकल की ज्याम राग यायचा.
पण, आक्कानी दुपारी त्यांच्या घरातून हाथ पकडून हाकलून दिलं तरी आम्हीं निर्लज्ज सारखे पुन्हा संध्याकाळी जाऊन बसायचो.
जिथं जितू दादा, बंटी आबा, भारती माई हे देखील हाकलले जायचे तिथं आपण, किस खेत की मूली असं वाटतं असावं!
त्याकाळात, कदाचित आक्का हिचं एक व्यक्ती असावी जीचा कुणाला राग येत नसावा.
माझ्या साठी आक्कांच सर्वात आवडत वाक्य म्हणजे, "दिपू खिरुज लई जाय बरका..." त्या दिवशी सर्वांच्या घरी खिरूज च्या पाटोड्या किंवा लाडू बनायचे.
मला वाटतं, गॅलरीमध्ये आक्कांच घर सर्वात जास्त हॅपनिंग आणि ग्लॅमरस होतं. त्यांच्या घरात अगदीं छोटी घटना घडली तरी ती स्पेशल असायची. त्यात सर्वांचा सहभाग असायचा. धाडण्याच्या शेतातील भाजलेल्या ओल्या शेंगा, द्रक्षांसाठी लागणारे बॉक्स आणि त्यावर मारायचा शिक्का, कपू बाईच्या लग्नातील पत्रिका घडी करून पाकिटात टाकने, प्लास्टिक चे गोल गोल डिजाइन वाले पडदे बनवणे किंवा लोकर ची पिशवी... हे सर्व आइटम्स आक्कांच्याच घरात बनवले जातील असा अलिखित नियम होता!
पुन्हा गॅलरीत कुणाकडेहि नव्हते अशा वस्तू फक्तं त्यांच्या घरी होत्या जसे की त्यांचा कलर टीव्ही, गोदरेज कपाटात ठेवलेले स्टेपलर आणि पंचिंग मशीन, नवे कोरे फ्रिज आणि पाण्याच्या बाटल्या, मधल्या घरात ठेवलेली काचेची कपाट, ज्यात सर्वात भारी कप बशी, सरबत देण्याचे काचेचे ग्लास, कपु बाईने साफ करून चमकून ठेवलेले असायचे.
त्यामुळे, यांतील कुठलीही गोष्ट लागली की आक्कांची आठवण काढली जायची.
आक्कांच्या घरातील कुठल्याही विषयावर होणारी चर्चा हा एक अफलातून प्रकार होता. त्याची सुरवात आक्का करायच्या आणि मधूनच उठून किचन मध्ये जाऊन चहा ठेऊन यायच्या. शोभा ताई, रत्ना माई गावाहून आल्या की आम्हीं ही जाऊन बसायचो. त्या काळात मला माझे छडवेल चे नातेवाईक कोण हे कदाचित सांगता आले नसते पण मी, जगू मामा, नऱ्हा मामा, पला, कैल्या, लक्समा आक्का, मंगल, नाराबाबा, लखा मास्तर इत्यादी कॅरेक्टर्स बद्दल कॉन्फिडन्टली बोलू शकलो असतो.
गॅलरीतली दुपार म्हणजे, एक पाय लांब आणि दुसरा दुमडून जात्यावर हरभऱ्याची डाळ भरडणाऱ्या आक्का, हे चित्र माझ्या मनात पुरतं कोरल गेलं आहे.
आक्का निवांत क्वचित बसल्या असतील असं वाटतं. नेहमी काहीतरी निवड, भरड, सोल असच करतांना आठवतात. मम्मी सोबत बहिणींचं तरं देवरे मावशीं सोबत मैत्रीच नातं असावं असं मला वाटतं. मागच्या दारी यांना हसून गप्पा मारताना पाहिलेल आठवत.
शेवाळीचे भाऊसाहेब गेले ही बातमी आली तो प्रसंग सर्वात वाईट होता. गॅलरीतील प्रत्येक घरात रडारड चालू होती. तोवर रघुदादांना नेहमीच शिस्तीत आणि फ्रेश बघत आलो होतो. त्यामुळे दादा समोर आले तरी उठून उभे राहायची सवय होती. पण त्या दिवशी मधल्या घरात, शंकराच्या फोटो समोर दादांना धाय मोकलून रडतांना पाहिलेला प्रसंग आजही आठवला तरी आंगावर काटा उभा राहतो. इतके मोठे दादा अश्या पद्धतीने रडतांना बघितल्यावर त्या वयात काहीच सुचत न्हवत. पण अश्या प्रसंगात देखील आक्का खंबीर उभ्या होत्या. दादांचं सांत्वन करत होत्या.
संतू भाऊ चा अपघात झाला त्याकाळात तरं दादा बरेच हळवे झाले होते पण आक्का खंबीर राहिल्या. कदाचित आतून त्यांना वाटतं असावं पण वरून तरी त्या सर्व चांगलं आहे असा आव आणायच्या. उलट आपण त्याला जगण्याचा पॉझिटिव अप्रोच म्हणून बघितलं तरं त्याच महत्त्व लक्षात येईल.
सकाळी भाऊंना फोन केला तेंव्हा ते म्हणाले, आक्कानी करोनाची टेस्ट केली म्हणून कदाचित कच खाल्ली असेल आणि त्यातूनच हार्ट अटॅक आला असेल... त्यावेळीं मला प्रश्न पडला, इतक्या मोठ्या मोठ्या संकटाना धिरानी सामोरी जाणारी आक्का अशी बरे कच खाईल. कदाचित हे नियतीनं ठरवलेलं प्रारब्ध असेल. कारण सत्तरी पार केली तरी अक्का मात्र कणखर वाटायच्या.
खूप वर्ष संपर्क न्हवता. नौकरी संसार तो ही दूर मुंबईत. त्यामुळे आई आणि भारती माई कडून फक्तं खबर मिळायची. पण, माझा सिनेमा आला त्याकाळात अचानक एक फोन आला. मी एका शूट वर होतो. समोरून एका ज्येष्ठ बाईंचा आवाज आला. मी अक्का बोली राहिणू.
इतक्या वर्षांनी तो आवाज ऐकत होतो तरी कोणती आक्का हे मला लगेच समजलं.
" भाऊ तूले मी टी वी वर दखं. तू आते, पाहिले पेक्षा चांगला दिसाले लागणा. तूनी बाई भी चांगली शे..."
आक्कांचा अचानक आलेला तो कॉल, माझ्या कायम स्मरणात राहील.
बापू, वारले तेंव्हा शोभा ताई कडे भेटायला गेलो तर आक्कांनी लागलीच मुका घेतला. मला भारी वाटलं.
भेटलो, की आजही मम्मी पप्पी घेतात हे नेहमीच आहे. पण आक्कांनी ही घेतली तेंव्हा आता त्या खूप हळव्या झाल्या आहेत की काय असं जाणवलं. पण मग मी तो विचार लगेच झटकून दिला. कारण अक्कांचा तो स्वभाव नव्हता. आक्का म्हणजे कणखर ही डेफिनेशन होती.
एकदा आमची मोटारसायकल चोरीला गेली. त्यावेळीं कारखान्याचे दिवसही फार बरे नव्हते. आई तरं हळवी होऊन रडत होती. नशिबाबद्दल बोलत होती. त्यावेळी, दादा आणि आक्का घरी आले आणि म्हणाले,
"दादा मना इतला सोना सारखा जावई चोरी व्हई गया, तूना मायक फटफटी नहीं ते दुसरी कितली भी मौल्यवान वस्तू चोरी जाती ते मी रडतू नहीं..."
त्या दिवसानंतर मात्र आमच्या घरात कुणीच चोरलेल्या मोटारसायकल चा विषय काढला नाहि!
आज सकाळपासून आईशी आक्कांबद्दल बोलतोय, ती म्हणतेय, आपण सर्व मनुष्य प्राणी. त्यानुसार आपल्यात इगो असतो, कधी कधी इर्षा असते, इतरांविषयी राग येतो त्यातून आबोला होता... इतकी वर्ष शेजारी शेजारी राहिल्यामुळे कधीतरी भांड्या ला भांड लागलं ही असेल.
आक्कांसोबत क्वचित असे प्रसंग घडलेही असतील पण आक्कनी कधी राग केला नाही की कधी मनात ठेवलं नाहीं. तेवढ्या पुरता मी अक्काला ऐकूनही द्यायची, ती ही गुपचूप ऐकून घ्यायची आणि दुसर्या दिवशी परत कुसुम कुसुम म्हणत जवळ यायची.
पुलं देशपांडेच एक गाजलेले पात्र आहे, अंतू बरवा नावाचं. मला, आक्का त्या अंतू बरवा सारख्याच वाटतात. पुलंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, बाहेरून नारळा सारख्या कितीही टणक वाटल्या तरी आतून खोबर्या सारख्या मऊ!
आपल्याला पहाटे साडेचार वाजता उठून शेतात जाणारे शिस्तप्रिय दादा आठवत असतील पण त्यांना त्यावेळी चहा करून देणारी आक्का ही असेलच की.
इथ आपण एक दोन मुलांना वाढवताना थकतोय, तिथं सहा मुलामुलींना वाढवणं निश्चितच सोपं नसेल...
राजवाड्याची पडझड झाली. एक एक करून सर्वच घर सोडून जायला लागले. देवरे मावशी तर खूप आधीच धुळ्याला शिफ्ट झाल्या. नंतर आलेल्या सुनंदा आक्का ही आबा दक्षिण आफ्रिकेत गेले म्हणून गावी गेल्या. के. जे. दादांनी ही नवीन घर बांधल.
जितू दादाच लग्न म्हणून गॅलरीतून सर्वात आधी मम्मी गेल्या. मग काही दिवसांनी आक्काहि जाणारं ही बातमी आली.
त्यावेळी मला आठवतं, मी बाहेर शिकत होतो.
जोशी दादा मावशी, आक्कांचं घर आणि आमचे आई दादा इतकीच मंडळी राहिलेली. त्यात आई दादांना सर्वात मोठा आधार आक्कांच्या घराचा होता.
आता ते ही कॉलनीत राहायला जाणार होते म्हणून बाहेर गावी होतो तरी गॅलरी सुनी झाली म्हणून लक्ष लागत नव्हत.
पडक्या गॅलरीत राहणारे आई-दादा आणि जोशी दादा मावशी आठवले की शिकणाऱ्या दिवसांत वाईट वाटायचं.
मग काही वर्षांनी जोशी मावशी गेल्या नंतर दादा. खूप वाईट वाटलं. त्यांना शेवटच्या दिवसांत आपण बघुही शकलो नाही ही खंत होतीच. मध्ये नाशिक ला एका लग्नात जोशी भाऊ भेटले. त्यावेळी दादा मावशींचा विषय निघाला तसे भाऊंचे चे डोळे पाणावलेले जाणवले. जुने दिवस आठवले. आमचे दादा जाऊनही दहा वर्षे झाली. गेल्या वर्षी के जे दादा गेले तेंव्हा राहुलनी बऱ्याच आठवणी सांगितल्या वाड्याच्या. आणि आता काल आक्का.
एखादी जागा तुम्हाला किती देऊन जाते. बालपण, संस्कार जगण्याचा अप्रोच असं बरंच काही.
आता असं वाटतं आपल ही अर्ध आयुष्य संपलं. वाड्यात फार-फार सतरा अठरा वर्षे राहिलो असेल. आता त्याहून अधिक जगल गेलं. म्हणजे वाड्यापेक्षा अधिक चा काळ बाहेर घालवला गेला. कधी बालपणीतल्या एखाद्या प्रसंगाचे स्वप्न जरी पडले तरी त्यात बॅकग्राउंडला वाडा आणि गॅलरीतील ते घरच येतं. अजूनही तिथल्या आठवणीं जात नाहीत. त्या हृदयाच्या एका कोपऱ्यात सदैव जपून ठेवलेल्या असतील. त्यात आक्कंची देखील एक फिक्स जागा असेल हे निश्चित!
बाळासाहेबा इतक्या दुरून आक्काची बातमी वाचून एका वाक्यात जर म्हणत असतील की she was like second mother to everyone... म्हणजे यातच सर्व आलं कि !
आक्का तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
No comments:
Post a Comment