गुरुदत्त मंदिर आणि परिसर, साक्री
ऐंशी आणि नव्वद च्या दशकांत साक्रीत बालपण घालवलेल्या प्रत्येकाला हळहळ वाटेल अशी अवस्था आज गुरुदत्त मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची झालेली आहे.
लहानपणी वडिलांचा बोट धरून ताडी बगीचा मार्गे, नदीचा पुल ओलांडून गुरुदत्त मंदिर गाठता येत असे. त्यावेळी गावातील सर्वात दूरवरच ठिकाण म्हणजे हे मंदिर.
वडिलांची जागा मग शाळेतले मित्र आणि त्यांच्या सायकलीनी कधी घेतली जाई कळतं नसे.
दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करणे म्हणजे गुरुदत्तच्या मंदिरात जाणे असा एक अर्थ असायचा.
दहावी-बारावी चा निकाल लागला कि आधी गुरुदात्ताला नारळ...
मग आयुष्यात हा सिलसिला अगदी कॉलेज चे अडमिशन, पहिला जॉब ते लग्न या पर्यंत सुरूच राही. त्यावेळी गुरुवारी मोठी आरती व्हायची आणि सोबत गव्हाचा शिरा मिळायचा...
आज दिसत ते गणपती मंदिर किंवा अलीकडचे ‘सोय’ म्हणून आलेले मारुती नव्हते तेंव्हा.
समर्थांचं केंद्र आणि छोटे पण टुमदार गुरुतत्त मंदिर एवढच...!
गावाच्या वेशीवरच ग्राम दैवतच जणू...
रंगपंचमीला गावातील पोर रंगानी माखलेले अंग घेऊन समोरच्या नकट्या बंधाऱ्यावर अंघोळीला जात,
येताना गुरुदत्त मंदिरात साखळीने बांधलेल्या ग्लास नि पोटभर पाणी प्यायचे आणि मार्केट मधल्या शेंगा खाऊन ढेकर द्यायची, हि एक आवडती सवय...
न्यू इंग्लिश स्कूल असेल किंवा आदर्श शाळा, बाई/सर कधीतरी अख्खा वर्ग घेऊन या परिसरात हजेरी लावायचे, सहल कम स्टडी टूर व्हायची...!
वयोमानानुसार प्रत्येकाला या परीसारचे महत्व माहित होते...
जेष्ठ नागरिकांसाठी सकाळी संद्याकाळी काठी धरत पाय आणि मन मोकळे करण्याचे हक्काचे ठिकाण...
बऱ्याच वडिलधाऱ्या मंडळीनी आपल्या मुला-नातवांची लग्न इथेच उभ्याउभी चर्चा करून ठरवलेली...
जावा-जावा नि घरात मोकळ बोलता येत नाही म्हणून गुरवारी इकडचा रस्ता धरलेला...
कॉलेज ला जाणारे ‘तो’ असेल किंवा ‘ती’ अबोलपणे एकमेकांना इथेच भेटत...
कितीतरी साक्रीकारांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि घंटांचा साक्षीदार हे मंदिर असेल...कितीकांनी आयुष्यात आपण काय मिळवायचे हे या दत्तच्या साक्षीने ठरवले असेल...
गाव सोडून बाहेरगावी शिकायला निघालेली पोर एसटी च्या खिडकी मधून हळूच दत्ताचा आशीर्वाद मागत असतील...
सासरी निघालेल्या कितीतरी लेकी सुनांनी गाडीतूनच साश्रू नयनांनी या मंदिराचे दर्शन घेतलं असेल... तिच्या आणि त्याच्या चोरून झालेल्या शेवटच्या भेटीला हा परिसर साक्षीदार नसेल कश्यावरून...
गाव सोडून जाताना सर्वात शेवटी दिसत ते हे मंदिर...आणि गावी परत येताना स्वागताला सर्वात आधी येत तेही मंदिरच...
गुरुदत्त मंदिर आणि परिसराची आजची हि अवस्था बघून वाटत कि उद्या हे मंदिरच नसेल तर...
...तर आठवणीत काय ठेवायचं...?
ऐंशी आणि नव्वद च्या दशकांत साक्रीत बालपण घालवलेल्या प्रत्येकाला हळहळ वाटेल अशी अवस्था आज गुरुदत्त मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची झालेली आहे.
लहानपणी वडिलांचा बोट धरून ताडी बगीचा मार्गे, नदीचा पुल ओलांडून गुरुदत्त मंदिर गाठता येत असे. त्यावेळी गावातील सर्वात दूरवरच ठिकाण म्हणजे हे मंदिर.
वडिलांची जागा मग शाळेतले मित्र आणि त्यांच्या सायकलीनी कधी घेतली जाई कळतं नसे.
दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करणे म्हणजे गुरुदत्तच्या मंदिरात जाणे असा एक अर्थ असायचा.
दहावी-बारावी चा निकाल लागला कि आधी गुरुदात्ताला नारळ...
मग आयुष्यात हा सिलसिला अगदी कॉलेज चे अडमिशन, पहिला जॉब ते लग्न या पर्यंत सुरूच राही. त्यावेळी गुरुवारी मोठी आरती व्हायची आणि सोबत गव्हाचा शिरा मिळायचा...
आज दिसत ते गणपती मंदिर किंवा अलीकडचे ‘सोय’ म्हणून आलेले मारुती नव्हते तेंव्हा.
समर्थांचं केंद्र आणि छोटे पण टुमदार गुरुतत्त मंदिर एवढच...!
गावाच्या वेशीवरच ग्राम दैवतच जणू...
रंगपंचमीला गावातील पोर रंगानी माखलेले अंग घेऊन समोरच्या नकट्या बंधाऱ्यावर अंघोळीला जात,
येताना गुरुदत्त मंदिरात साखळीने बांधलेल्या ग्लास नि पोटभर पाणी प्यायचे आणि मार्केट मधल्या शेंगा खाऊन ढेकर द्यायची, हि एक आवडती सवय...
न्यू इंग्लिश स्कूल असेल किंवा आदर्श शाळा, बाई/सर कधीतरी अख्खा वर्ग घेऊन या परिसरात हजेरी लावायचे, सहल कम स्टडी टूर व्हायची...!
वयोमानानुसार प्रत्येकाला या परीसारचे महत्व माहित होते...
जेष्ठ नागरिकांसाठी सकाळी संद्याकाळी काठी धरत पाय आणि मन मोकळे करण्याचे हक्काचे ठिकाण...
बऱ्याच वडिलधाऱ्या मंडळीनी आपल्या मुला-नातवांची लग्न इथेच उभ्याउभी चर्चा करून ठरवलेली...
जावा-जावा नि घरात मोकळ बोलता येत नाही म्हणून गुरवारी इकडचा रस्ता धरलेला...
कॉलेज ला जाणारे ‘तो’ असेल किंवा ‘ती’ अबोलपणे एकमेकांना इथेच भेटत...
कितीतरी साक्रीकारांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि घंटांचा साक्षीदार हे मंदिर असेल...कितीकांनी आयुष्यात आपण काय मिळवायचे हे या दत्तच्या साक्षीने ठरवले असेल...
गाव सोडून बाहेरगावी शिकायला निघालेली पोर एसटी च्या खिडकी मधून हळूच दत्ताचा आशीर्वाद मागत असतील...
सासरी निघालेल्या कितीतरी लेकी सुनांनी गाडीतूनच साश्रू नयनांनी या मंदिराचे दर्शन घेतलं असेल... तिच्या आणि त्याच्या चोरून झालेल्या शेवटच्या भेटीला हा परिसर साक्षीदार नसेल कश्यावरून...
गाव सोडून जाताना सर्वात शेवटी दिसत ते हे मंदिर...आणि गावी परत येताना स्वागताला सर्वात आधी येत तेही मंदिरच...
गुरुदत्त मंदिर आणि परिसराची आजची हि अवस्था बघून वाटत कि उद्या हे मंदिरच नसेल तर...
...तर आठवणीत काय ठेवायचं...?

No comments:
Post a Comment